स्वर्गीय केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर : बीडच्या विकासाची दिशा दाखवणारी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

 बीडच्या विकासाची दिशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : स्व. खा.केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर

    बीड जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात स्त्रीशक्तीची खरी ओळख करून देणारे नाव म्हणजे स्व. केसर काकू सोनाजीराव क्षीरसागर. राजुरीच्या (न) सरपंच पदापासून सुरुवात करून बीड जिल्ह्याच्या खासदारपदापर्यंत पोहोचलेली त्यांची राजकीय कारकीर्द खरंच प्रेरणादायी ठरते. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी आपलं आयुष्य झोकून देणाऱ्या काकूंनी बीड जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून टाकला.

रेल्वेचे स्वप्न – बीडकरांच्या हृदयात घर करणारा प्रयत्न

       नगर बीड परळी हा रेल्वे मार्ग सुरू करण्याची मागणीची खरी सुरुवात स्वर्गीय खासदार केशर काकू क्षीरसागर यांनी केली   सन 1980 ला लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेस पक्षाच्या वतीने 67 हजार मतांनी केसरबाई( काकू) क्षीरसागर या विजयी झाल्या होत्या. काकू खासदार झाल्या नंतर त्यांनी बीड रेल्वेचा सातत्याने दहा वर्ष पाठपुरावा केला केशर काकूंनी सन 1984  मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटून बीड जिल्ह्यातील नगर- बीड- परळी हा रेल्वेमार्ग करणे गरजेचे असल्यामुळे तो मंजूर करावा अशी मागणी काकूंनी  केली होती. 

         पण दुर्दैवाने काही दिवसातच देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली.  व नंतर  काही दिवसने म्हणजे सन 1984 ला लोकसभा निवडणुका पार पडल्या  यात  काकू दुसऱ्यांदा बीडच्या खासदार म्हणून निवडून आल्या यावेळेस देशाचे  पंतप्रधान राजीव गांधी हे होते  काकूंनी रेल्वेचा प्रश्न घेऊन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनाही भेटायला गेल्या दिल्लीला जातांना त्याच्या नेतृत्वाखाली  सदस्यांच शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन त्या तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीं यांना भेटल्या



व त्याच्या सूचनेनुसार रेल्वे विभागामार्फत बीड रेल्वे प्रकल्पासाठी सर्वेक्षण पार पडलं या सर्वेक्षणानंतर असा अहवाल आला की बीड हे औद्योगिक शहर नाही त्यामुळे बीडमध्ये रेल्वे मार्गावरून फार मोठा महसूल देखील मिळणार नाही त्यामुळे हा मार्ग आर्थिक दृष्ट्या परवडणारा नाही तेव्हा राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री होते मा.सी के जाफर शरीफ या अहवालामुळे बीडला आधीच रेल्वे मिळू शकणार नाही याची भीती काकूंना होतीस म्हणून त्यांनी जाफर शरीफ यांची भेट घेऊन बीड जिल्ह्याचा विकासासाठी रेल्वे  खूप गरजेचे आहे असं दाखवून दिल



           आणि सभागृह देखील त्या भाषण करताना आम्हा बीडकरणा अजून किती दिवस विकासापासून दूर ठेवणार म्हणून त्यांनी रेल्वेचा प्रश्न लावून धरला होता. त्यानंतरचा सन 1989 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षा कडून  देण्यात आला पण  काकूंचा या निवडणुकीत पराभव झाला सन 1991 मध्ये देशात मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या याच दरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. इकडे बीडमधून पुन्हा केशर काकूंना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि काकू निवडून आल्या सन 1991 मध्ये नरसिंहराव पंतप्रधान होते आणि रेल्वेमंत्री होते सुरेश कलमाडी केशर काकूंच्या दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर बीडच्या रेल्वे प्रकल्पाला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळण्यातील सर्व अडथळे दूर झाले सन 1995 मध्ये या मार्गाला केंद्राकडून मंजुरी मिळाली आणि या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी यांचे उपस्थितीत चंपावती क्रीडा मंडळावर करण्यात आलं होते

काकूंच्या राजकीय प्रवासात एक मोठं स्वप्न होतं बीड जिल्ह्यात रेल्वे यावी. खासदार झाल्यापासून त्यांनी या प्रश्नाला प्राधान्य दिलं. केंद्र सरकारमध्ये अनेकदा शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाणं, अर्थमंत्री, रेल्वेमंत्री, पंतप्रधान आणि अगदी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचून पाठपुरावा करणं बजेटमध्ये रेल्वेसाठी सुरुवातीला आर्थिक तरतूद करून घेणं, बीडमध्ये रेल्वेचं भूमिपूजन करणं, आणि त्या कामाला गती देणं – हे सगळं काकूंच्या चिकाटीचं प्रतीक आहे. आज बीडकर रेल्वेचं स्वप्न साकार होताना पाहत आहेत, तेव्हा त्यामागे स्वर्गीय काकूंचा दूरदृष्टीपूर्ण वाटा असल्याचं कोणीही विसरू शकत नाही. बीडमध्ये रेल्वे स्थानक उभं राहताना ते काकूंच्या नावाने गौरवलं जावं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.

   *शिक्षणाच्या क्षेत्रातील भव्य कामगिरी*

काकूंचा विश्वास होता की, गावोगावी ज्ञानगंगा पोहोचली पाहिजे. यासाठी त्यांनी शाळा, महाविद्यालयं आणि विविध शैक्षणिक प्रकल्प उभे केले.

बीड जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व आश्रमशाळांचं जाळं उभं केलं.





मेडिकल कॉलेज, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, सैनिक स्कूल यांसारख्या संस्थांमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व राष्ट्रीय स्तरावर करिअरची दारे खुली झाली.



टीव्ही केंद्र, रेडिओ केंद्र आणि सूतगिरणीसारख्या प्रकल्पांनी बीडच्या जनतेपर्यंत आधुनिक साधनं व रोजगार पोहोचवला.

  काकूंच्या प्रयत्नांमुळे हजारो मुला-मुलींना शिक्षणाची संधी मिळाली, तर ग्रामीण भागात रोजगाराची साधनं निर्माण झाली.

सामाजिक कार्य आणि सन्मान:-

काकू केवळ राजकारणी नव्हत्या, तर त्या जनतेच्या हृदयातली सामाजिक कार्यकर्त्या होत्या.

आशिया खंडातील प्रथम महिला चेअरमन म्हणून साखर कारखान्याचं यशस्वी नेतृत्व करण्याचं मानांकन काकूंना मिळालं.

  गोरगरीब जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, महिलांना सबलीकरणाची संधी देणं, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणं  हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना मराठवाडा भूषण आणि शिक्षण शिरोमणी पुरस्काराने गौरविण्यात आलं.

   बीडच्या विकासातील सिंहाचा वाटा

काकूंनी बीड जिल्ह्यासाठी केलेली कामगिरी बहुआयामी आहे. उद्योग, शिक्षण, रेल्वे, प्रसारमाध्यमं, कृषी, महिला सबलीकरण – प्रत्येक क्षेत्रात त्यांची दूरदृष्टी दिसून येते. बीडच्या सर्वांगीण विकासासाठी काकूंनी ज्या प्रमाणात प्रयत्न केले, त्यामुळं आजही त्यांची आठवण प्रत्येकाच्या मनात घर करून आहे.

स्वर्गीय केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर या केवळ बीडच्याच नव्हे तर मराठवाड्याच्या प्रेरणादायी नेत्यांपैकी एक होत्या. त्यांचं आयुष्य हे ध्येय, जिद्द, चिकाटी आणि जनतेप्रती असलेल्या समर्पणाचं प्रतीक आहे. आज बीडकर रेल्वेच्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, तेव्हा हे स्वप्न साकार करण्यामागे काकूंच्या अथक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे.

 त्यांचं कार्य, त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील.

              @तनवीर पठाण सर@

           काझी नगर जालना रोड बीड







No comments:

Post a Comment

स्वर्गीय केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर : बीडच्या विकासाची दिशा दाखवणारी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

  बीडच्या विकासाची दिशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : स्व. खा.केसरबाई (काकू) सोनाजीराव क्षीरसागर     बीड जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात...